दिनांक ११ जुलै रोजी ब्राह्मणवाडी येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम – शेत तेथे पौष्टीक तृणधान्य अंतर्गत नागली बियाणे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास गावाचे सरपंच , उपसरपंच उपस्थित होते. यावेळी सरपंच श्रीमती आशा करबट यांनी नागली खाद्यपदार्थ व भाकरी आपल्या आहारात आणणे अतिशय गरजेचे आहे असे सांगितले. उपसरपंच बाळकृष्ण वनगा यांनीआपल्या कडे असलेल्या वरकस जागेत नागली व तूर लागवड करून आपल्या उत्पादन वाढवावे. असे आवाहन केले.येथील कृषि सहाय्यक मंदा सापटे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत नागली लागवड करुन क्षेत्र वाढीस मदत करावी असे सुचविले.