![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/02/IMG-20230212-WA0007-1024x768.jpg)
मौजे सिताडीपाडा वार्सा तालुका साक्री येथे 91 वर्षीय स्थानिक ज्येष्ठ नागरिक जाण्या मन्या राऊत यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. निरोगी जीवनासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व दुष्काळाच्या कालावधीमध्ये विविध तृणधान्यांनी ग्रामीण भागातील जनतेला भूकमारीपासून कसे वाचवले याबद्दल आजोबांनी नवीन पिढीला अवगत केले.
आयोजित कार्यक्रमांमध्ये कृषी पर्यवेक्षक श्री शिवाजी राऊत यांनी स्थानिक मावची भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.