प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिमे अंतर्गत आज मौजे तारदाळ मधील सन्मती विद्यालय तारदाळ येथे कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य श्री.तेरदाळे सर यांनी प्रास्तविक व स्वागत केले. मंडळ कृषी अधिकारी श्री.नंदकुमार मिसाळ यांनी पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, राजगिरा, वरई, नाचणी, राळा इत्यादीचे आहारातील महत्त्व व फायदे सांगितले. श्री. रमेश परीट कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टिक तृणधान्याच्या बियाणांची ओळख, लागवडीचे तंत्रज्ञान व त्यांचे महत्व घोष वाक्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले, मा.तालुका कृषी अधिकारी श्री.अभिजित गडदे यांनी कृषी विभाग राबवित असणाऱ्या योजनांची माहिती दिली व सर्व विध्यार्थी व शिक्षक वृंद यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष ची शपथ दिली. कार्यक्रमाचे आभार कृषी सहाय्यक श्री. सचिन आलमाने यांनी मानले.