नागरीकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा
श्री. रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

नागरीकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा) यांचा समावेश करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी “मकर संक्रांती-भोगी” पौष्टिक तृणधान्य दिना निमित्त केले.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस जिल्हयामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आत्मा, सभागृह, नांदेड येथे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये तृणधान्याचा आरोग्यातील महत्व या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. तसेच तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान याबददल माहिती देऊन तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा या तृणधान्य या पिकांपासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ-उपपदार्थ आहारासाठी पौष्टीक असल्याने त्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले. सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. अरविंद पांडागळे प्रमुख शास्त्रज्ञ, कापुस संशोधन केंद्र, नांदेड, श्री. राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळ, श्री. डॉ. चिमनशेटटे, जिल्हा कृषि विकास अधिकारी,नांदेड यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. रविशंकर चलवदे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री. रत्नाकर गंगाधर ढगे मौ. सायाळ ता. लोहा (राजगिरा उत्पादक शेतकरी) यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. श्रीमती सोनवणे एम.आर. प्रकल्प उपसंचालक, आत्मा यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे महिला बचत गट प्रतिनिधी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी, नांदेड कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे शेवटी श्री. सिध्देश्वर मोकळे, तालुका कृषि अधिकारी, नांदेड यांनी सर्वांचे आभार मानले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →