![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-03-27-at-3.39.05-PM-944x1024.jpeg)
कोल्हापूर येथील श्रीमती राजश्री सावंत यांनी लहान मुलांना व मोठ्यांना पोष्टिक असे नाचणी, बाजरी अशा तृण धान्या पासून अनोख्या पदार्थांची निर्मिती केली आहे. नाचणी,बाजारी आणि ज्वारीचे चॉकलेट, पिझ्झा, नूडल्स,पुलाव बनवायला सुरुवात केली आहे. सावंत स्वयंसिद्धा, आत्मा आणि कृषि विभागाशी जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमातून त्या शेतकर्यांना दूध प्रक्रिया, तृणधान्य प्रक्रियेतून अर्थार्जन करता येईल असे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देतात. आजवर त्यांनी 150 हून अधिक शेतकर्यांना प्रशिक्षण दिले आहे.